“जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व हरपले” फडणवीसांकडून एक्सवर कर्डीले यांना श्रद्धांजली

मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद प्रसंगी एक्स वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हटले आहेत की,“शिवाजीराव कर्डीले हे ग्रामीण भागाची नाडी ओळखणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजकारण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी राहुरी मतदारसंघ आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून कार्य केले. त्यामुळेच त्यांना सलगपणे जनतेने आपला विश्वास दिला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासातही मोलाची भर घातली.”


“त्यांच्या अचानक जाण्याने राहुरी मतदारसंघातील संवेदनशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने केवळ कर्डीले आणि जगताप कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कर्डीले यांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या असून, “या कठीण प्रसंगात कुटुंबीयांना ईश्वराने सामर्थ्य द्यावे,” अशी प्रार्थना केली. त्यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी