“जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व हरपले” फडणवीसांकडून एक्सवर कर्डीले यांना श्रद्धांजली

मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद प्रसंगी एक्स वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हटले आहेत की,“शिवाजीराव कर्डीले हे ग्रामीण भागाची नाडी ओळखणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजकारण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी राहुरी मतदारसंघ आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून कार्य केले. त्यामुळेच त्यांना सलगपणे जनतेने आपला विश्वास दिला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासातही मोलाची भर घातली.”


“त्यांच्या अचानक जाण्याने राहुरी मतदारसंघातील संवेदनशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने केवळ कर्डीले आणि जगताप कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कर्डीले यांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या असून, “या कठीण प्रसंगात कुटुंबीयांना ईश्वराने सामर्थ्य द्यावे,” अशी प्रार्थना केली. त्यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील