“जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व हरपले” फडणवीसांकडून एक्सवर कर्डीले यांना श्रद्धांजली

मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद प्रसंगी एक्स वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हटले आहेत की,“शिवाजीराव कर्डीले हे ग्रामीण भागाची नाडी ओळखणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजकारण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी राहुरी मतदारसंघ आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून कार्य केले. त्यामुळेच त्यांना सलगपणे जनतेने आपला विश्वास दिला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याच्या विकासातही मोलाची भर घातली.”


“त्यांच्या अचानक जाण्याने राहुरी मतदारसंघातील संवेदनशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने केवळ कर्डीले आणि जगताप कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार कर्डीले यांच्या कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त केल्या असून, “या कठीण प्रसंगात कुटुंबीयांना ईश्वराने सामर्थ्य द्यावे,” अशी प्रार्थना केली. त्यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई