पालघरमध्ये एसटी बससेवेची स्थिती बिकट

नवीन बस पुरवाव्यात अशी सरनाईक यांच्याकडे मागणी


पालघर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि सेवा सुविधा याबाबत मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा सुविधा आणि प्रशासकीय प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. पारस संजय सहाणे यांनी केली. त्याचबरोबर आदिवासी बहुल, ग्रामीण आणि गोरगरीब जनतेचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड या दुर्गम भागांमध्ये दळणवळणाचे एकमेव साधन असलेल्या “लालपरी” एस.टी. बससेवेची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या भागांमध्ये अनेक नागरिक एस.टी. बससेवेवरच अवलंबून असल्याने नवीन बस मंजूर करण्याची तातडीची गरज असल्याचेही ॲड. पारस सहाणे यांनी नमूद केले. परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आदिवासी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे हे सरकारचे प्राधान्य असून, नागरिकांना चांगली व वेळेवर बससेवा मिळावी यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी