कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत ही तिसरी घटना आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी स्वीकारली आहे. दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सूत्रांकडून सांगितलं जातंय.


सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका वाहनातून गोळीबार होताना स्पष्ट दिसत आहे. खिडकीतून हात बाहेर काढून एका व्यक्तीने पिस्तूलमधून सलग गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुमारे सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


हल्ल्यानंतर ढिल्लन आणि सिद्धू यांनी एक पोस्ट करून जबाबदारी स्वीकारली आणि सर्वसामान्य नागरिकांना दूर राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आमचे सामान्य लोकांशी कोणतेही वैर नाही. आमचा वाद फक्त काही विशिष्ट लोकांशी आहे. जे बेकायदेशीर कामात गुंतले आहेत आणि आपले पैसे देत नाहीत, त्यांनी सज्ज राहावे.”


त्यांनी बॉलिवूडमध्ये “धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांनाही” चेतावणी दिली “गोळ्या कुठूनही येऊ शकतात, तयार राहा,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.


याआधी, ८ ऑगस्ट रोजी झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात सुमारे २५ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या घटनेतील व्हिडिओत हल्लेखोरांचा आवाज ऐकू येतो – “आम्ही लक्ष्याला फोन केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर आता तरी त्याने रिंग ऐकली नाही, तर पुढील कारवाई मुंबईत होईल.” या इशाऱ्यानंतर कपिल शर्माच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.


पहिला हल्ला १० जुलै रोजी झाला होता. त्या वेळी काही कर्मचारी कॅफेत उपस्थित होते. कोणीही जखमी झाले नसले तरी कॅफेच्या खिडक्यांवर दहा हून अधिक गोळ्या लागल्या होत्या.


पहिल्या घटनेनंतर, बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित हरजीत सिंग लड्डी याने जबाबदारी स्वीकारली होती. त्याने सांगितले की कपिल शर्माच्या कार्यक्रमात एका कलाकाराने निहंग शिखांच्या पारंपरिक पोशाखांवर विनोद केला होता, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.


BKI या संघटनेला कॅनडाच्या सरकारने दहशतवादी संघटना घोषित केले आहे, तर हरजीत सिंग लड्डी हा भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) सर्वाधिक वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी