विरोधकांमध्ये फूट, शरद पवारांचा पक्ष संसदीय समितीच्या कामकाजात भाग घेणार

नवी दिल्ली: सगल तीस दिवस कारावास भोगावा लागलेले मुख्यमंत्री, मंत्री आणि पंतप्रधान या केंद्र व राज्य सरकारांमधील उच्चपदस्थांना पदच्युत करणारे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मांडले आहे. या विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) नेमण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. पण बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्येच फूट पडली आहे. शरद पवारांच्या पक्षाने संसदीय समितीच्या कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.


संसदीय समितीच्या चर्चेत सहभागी होत असल्याचे शरद पवारांच्या पक्षाच्यावतीने लोकसभेतील खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. चर्चेवेळी आम्ही पक्षाची अधिकृत भूमिका मांडू, आमचा ज्या मुद्यांना विरोध आहे तो विरोध बैठकीत मांडू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मोदी सरकारच्या विनंतीला मान देत पक्षाने संसदीय समितीच्या कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.


केंद्राच्या विधेयकातून विरोधी पक्षातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा हेतू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा पक्ष, आम आदमी पक्ष, द्रमुक, डावे पक्ष या सर्वांनी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. पण शरद पवारांच्या पक्षाने विरोधकांच्या भूमिकेशी फारकत घेत समितीच्या कामकाजात सहभागी होण्याचे आणि तिथे विरोध व्यवस्थित मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या पक्षाचा वेगळा निर्णय हा विरोधकांच्या आघाडीला धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments
Add Comment

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य

आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार? मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या

उबाठाने मिनी कोकण भांडुपला बकाल केले!

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणू मुंबई : कोकण नगर, भांडुप येथे

शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?

अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? मुंबई : "ठाकरेंनी १९९७