पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला

संघर्षात २१ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद  : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता उघड संघर्षात बदललेला आहे. बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक शहरात हवाई हल्ले केले. हे हल्ले चमन बॉर्डर क्रॉसिंगच्या जवळ करण्यात आले, जिथे अफगाण-तालिबानच्या तीन चौक्यांना लक्ष्य बनवण्यात आले. स्थानिक सूत्रांनुसार, लोकांनी ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब टाकले जाताना पाहिले. अफगाण सीमा पोलिसांनी सांगितले की, स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरला आणि अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.


बुधवारी स्पिन बोल्डकमधील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये परिसरातून उठणारा घनदाट धूर दिसून येतो. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर संघर्ष अधिकच वाढला आहे. दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण २१ जण मृत्युमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सहा पाकिस्तानी पॅरामिलिटरी सैनिक मारले गेले, तर १५ अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले असून डझनभर जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा ११ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर सातत्याने चकमकी घडत आहेत. या दिवशी अफगाण सुरक्षा दलांनी अनेक पाकिस्तानी पोस्ट्सवर हल्ला केला होता. वृत्तसंस्थेनुसार, अफगाण अधिकाऱ्यांचा दावा आहे की, त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं, तर पाकिस्तानने म्हटलं की त्यांनी २३ सैनिक गमावले आणि २०० हून अधिक ‘तालिबानी सैनिक आणि दहशतवादी’ मारले.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .