पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला

संघर्षात २१ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद  : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता उघड संघर्षात बदललेला आहे. बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक शहरात हवाई हल्ले केले. हे हल्ले चमन बॉर्डर क्रॉसिंगच्या जवळ करण्यात आले, जिथे अफगाण-तालिबानच्या तीन चौक्यांना लक्ष्य बनवण्यात आले. स्थानिक सूत्रांनुसार, लोकांनी ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब टाकले जाताना पाहिले. अफगाण सीमा पोलिसांनी सांगितले की, स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरला आणि अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.


बुधवारी स्पिन बोल्डकमधील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये परिसरातून उठणारा घनदाट धूर दिसून येतो. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर संघर्ष अधिकच वाढला आहे. दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण २१ जण मृत्युमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सहा पाकिस्तानी पॅरामिलिटरी सैनिक मारले गेले, तर १५ अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले असून डझनभर जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा ११ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर सातत्याने चकमकी घडत आहेत. या दिवशी अफगाण सुरक्षा दलांनी अनेक पाकिस्तानी पोस्ट्सवर हल्ला केला होता. वृत्तसंस्थेनुसार, अफगाण अधिकाऱ्यांचा दावा आहे की, त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं, तर पाकिस्तानने म्हटलं की त्यांनी २३ सैनिक गमावले आणि २०० हून अधिक ‘तालिबानी सैनिक आणि दहशतवादी’ मारले.

Comments
Add Comment

RIIL Q2 Results: रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात घसरण

प्रतिनिधी:रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RIIL) कॅपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली:भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउडला सक्षम करण्यासाठी आयबीएमसोबत

विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४०