डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे वजनवाढीच्या समस्येला सामोरे जातात. सकाळचा आहार महत्त्वाचा मानला जातो, पण वजन कमी करायचं असल्यास रात्रीचा आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण दिवसाच्या शेवटी आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर, पचनावर आणि शरीरातील चरबीवर होतो.


जर रात्री हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा आहार घेतला, तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. परंतु तेलकट, मसालेदार आणि जड अन्नामुळे वजन वाढते तसेच झोपेतही अडथळा येतो. म्हणूनच तज्ज्ञ रात्रीच्या जेवणात कमी कार्ब आणि जास्त प्रथिने व फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.



वजन कमी करण्यासाठी उपयुक्त रात्रीचे पदार्थ


नारळ भात
नारळाचा भात हलका, स्वादिष्ट आणि पचायला सोपा असतो. यात शेंगदाणे, काजू आणि मोहरी टाकून बनवल्यास तो अधिक पौष्टिक होतो. यात चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तो वजन कमी करण्यात मदत करतो.


ओट्स इडली
ओट्सपासून बनवलेली इडली ही कमी कार्ब आणि जास्त प्रथिने असलेली उत्तम रात्रीची डिश आहे. ओट्स इडली सांबार किंवा चटणीसोबत खाल्ल्यास चव आणि आरोग्य दोन्ही जपले जातात.


मटार उपमा
मटारयुक्त उपमा फक्त नाश्त्यासाठी नव्हे तर रात्रीच्या जेवणासाठीही उत्कृष्ट पर्याय आहे. यात व्हिटॅमिन C, K, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गाजर, मिरची आणि कांदा घालून हा उपमा अधिक पौष्टिक बनतो.


मूग किंवा मसूर डाळ
हिरवे मूग, मसूर, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा वापरून बनवलेली डाळ हलकी आणि पौष्टिक असते. यात प्रथिने, लोह आणि फायबर मिळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.


हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, चाकवत अशा पालेभाज्या रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या भाज्यांमध्ये फायबर जास्त असल्याने पचन सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.


भाज्यांचे किंवा डाळींचे सूप
वजन कमी करायचे असेल तर सूप हा उत्तम पर्याय आहे. मसूर सूप, मिक्स व्हेज सूप किंवा पालेभाज्यांचे सूप हलके, पचायला सोपे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे असते. हलक्या मसाल्यांमध्ये आणि थोड्या तुपात ते बनवले की चव वाढते आणि आरोग्यही सुधारते.


तज्ज्ञांचा सल्ला


रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी घ्या.


साखर, तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ टाळा.


जेवणानंतर हलकी फिरत चालणे (वॉक) करा.


पाणी योग्य प्रमाणात प्या, पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका.


रात्रीचे अन्न हे वजन कमी करण्यासाठी ‘शत्रू’ नाही, तर योग्य निवड केली तर ते तुमच्या फिटनेस प्रवासातील साथीदार ठरू शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे