चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवणे आणि परत आणणे आहे.
याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवी अंतराळयान ‘गगनयान’ २०२७ मध्ये प्रक्षिप्त केले जाईल. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे आयोजित ३५ व्या दीक्षांत समारंभात नारायणन यांनी हे विधान केले. इस्रो प्रमुखांच्या मते, गगनयान मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पडणार आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये पहिले अभियान, ज्यामध्ये अर्ध-मानवी रोबोट "व्योममित्र" अवकाशात पाठवला जाईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. गगनयानचे पहिले मानवी अंतराळयान २०२७ च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल.


इस्रोचे भविष्यकालीन प्रकल्पही प्रकट झाले आहेत. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक तयार होईल, त्याचे प्रारंभिक मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केले जाऊ शकतात. चंद्रयान-४, चंद्रयान-५, मंगळ मोहिमेसह नवीन खगोलीय वेधशाळा मोहीमसारखे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन मंजूर झाले असून, सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेमार्फत १५ टेराबाइट्सपेक्षा अधिक डेटा गोळा झाला आहे. इस्रो प्रमुखांनी म्हटले की, भारत अवकाश संशोधनात स्वावलंबी होण्यावर भर देत आहे, पण हवामान विज्ञान आणि सहकार्याच्या क्षेत्रात खुले आहे.

Comments
Add Comment

Healthy Monsoon Diet : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं

Nashik : FDA अधिकाऱ्यांच्या नावाखाली खंडणी ! शहरात FDA च्या धाडी सुरू असताना तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप

Nashik : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून राज्यभर भेसळविरोधी धाडींचे सत्र सुरू असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत

Riteish Deshmukh : पत्रकाराच्या एका प्रश्नाने रंगला वाद; रितेश देशमुखचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या नव्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप: सच या

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून