चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवणे आणि परत आणणे आहे.
याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवी अंतराळयान ‘गगनयान’ २०२७ मध्ये प्रक्षिप्त केले जाईल. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे आयोजित ३५ व्या दीक्षांत समारंभात नारायणन यांनी हे विधान केले. इस्रो प्रमुखांच्या मते, गगनयान मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पडणार आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये पहिले अभियान, ज्यामध्ये अर्ध-मानवी रोबोट "व्योममित्र" अवकाशात पाठवला जाईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. गगनयानचे पहिले मानवी अंतराळयान २०२७ च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल.


इस्रोचे भविष्यकालीन प्रकल्पही प्रकट झाले आहेत. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक तयार होईल, त्याचे प्रारंभिक मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केले जाऊ शकतात. चंद्रयान-४, चंद्रयान-५, मंगळ मोहिमेसह नवीन खगोलीय वेधशाळा मोहीमसारखे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन मंजूर झाले असून, सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेमार्फत १५ टेराबाइट्सपेक्षा अधिक डेटा गोळा झाला आहे. इस्रो प्रमुखांनी म्हटले की, भारत अवकाश संशोधनात स्वावलंबी होण्यावर भर देत आहे, पण हवामान विज्ञान आणि सहकार्याच्या क्षेत्रात खुले आहे.

Comments
Add Comment

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन

Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

मुंबईतील बोरिवली (Boriwali) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित

Vaibhav Mangle Social Media Post : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर वैभव मांगले भावुक; 'त्यांच्या प्रतिभेला हवी तशी दाद मिळाली नाही'

मुंबई : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी भावुक पोस्ट (Post) शेअर करत त्यांना