चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवणे आणि परत आणणे आहे.
याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवी अंतराळयान ‘गगनयान’ २०२७ मध्ये प्रक्षिप्त केले जाईल. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे आयोजित ३५ व्या दीक्षांत समारंभात नारायणन यांनी हे विधान केले. इस्रो प्रमुखांच्या मते, गगनयान मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पडणार आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये पहिले अभियान, ज्यामध्ये अर्ध-मानवी रोबोट "व्योममित्र" अवकाशात पाठवला जाईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. गगनयानचे पहिले मानवी अंतराळयान २०२७ च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल.


इस्रोचे भविष्यकालीन प्रकल्पही प्रकट झाले आहेत. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक तयार होईल, त्याचे प्रारंभिक मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केले जाऊ शकतात. चंद्रयान-४, चंद्रयान-५, मंगळ मोहिमेसह नवीन खगोलीय वेधशाळा मोहीमसारखे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन मंजूर झाले असून, सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेमार्फत १५ टेराबाइट्सपेक्षा अधिक डेटा गोळा झाला आहे. इस्रो प्रमुखांनी म्हटले की, भारत अवकाश संशोधनात स्वावलंबी होण्यावर भर देत आहे, पण हवामान विज्ञान आणि सहकार्याच्या क्षेत्रात खुले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश झाला आहे. ही व्यक्ती मागील ३०

RIIL Q2 Results: रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात घसरण

प्रतिनिधी:रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RIIL) कॅपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

भारती एअरटेलने ‘एअरटेल क्लाउड' साठी आयबीएमसोबत धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली:भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउडला सक्षम करण्यासाठी आयबीएमसोबत

विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या