चंद्रावर स्वारी... भारत २०४० चंद्रावर पाठविणार मानव!

रांची  :भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी घोषणा केली की भारताचे उद्दिष्ट २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवणे आणि परत आणणे आहे.
याव्यतिरिक्त, भारताचे पहिले मानवी अंतराळयान ‘गगनयान’ २०२७ मध्ये प्रक्षिप्त केले जाईल. रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा येथे आयोजित ३५ व्या दीक्षांत समारंभात नारायणन यांनी हे विधान केले. इस्रो प्रमुखांच्या मते, गगनयान मोहिमेपूर्वी तीन मानवरहित मोहिमा पार पडणार आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये पहिले अभियान, ज्यामध्ये अर्ध-मानवी रोबोट "व्योममित्र" अवकाशात पाठवला जाईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा होतील. गगनयानचे पहिले मानवी अंतराळयान २०२७ च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल.


इस्रोचे भविष्यकालीन प्रकल्पही प्रकट झाले आहेत. २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक तयार होईल, त्याचे प्रारंभिक मॉड्यूल २०२७ पर्यंत अवकाशात तैनात केले जाऊ शकतात. चंद्रयान-४, चंद्रयान-५, मंगळ मोहिमेसह नवीन खगोलीय वेधशाळा मोहीमसारखे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. तसेच, शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन मंजूर झाले असून, सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य-L1 मोहिमेमार्फत १५ टेराबाइट्सपेक्षा अधिक डेटा गोळा झाला आहे. इस्रो प्रमुखांनी म्हटले की, भारत अवकाश संशोधनात स्वावलंबी होण्यावर भर देत आहे, पण हवामान विज्ञान आणि सहकार्याच्या क्षेत्रात खुले आहे.

Comments
Add Comment

विपुल अमृतलाल शाह यांनी लाँच केलं नवं म्युझिक लेबल, सिद्धिविनायक मंदिरात ‘शुभारंभ’ गाण्याचं उद्घाटन!

विपुल अमृतलाल शाह यांचं नवं म्युझिक लेबल लाँच झालं असून पहिलं गाणं ‘शुभारंभ’ सिद्धिविनायक मंदिरात रिलीज

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही कार विक्रीत लक्षणीय २२% वाढ

मोहित सोमण: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विक्रीत वाढ अपेक्षित होती. त्यात धर्तीवर कंपनीने आज आकडेवारी जाहीर

रतन टाटा यांचा सेशेल्समधील विला विक्रीसाठी

मुंबई : रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान बीचफ्रंट विला आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहे बेटाच्या शांत, नयनरम्य

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या