विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.



काय आहे प्रकरण?


पीडित तरुणी विरार (पूर्व) येथील नाना नानी पार्कजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच महाविद्यालयातील २१ वर्षीय अमित प्रजापती या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने हे संबंध तोडले होते. त्यानंतर अमित सतत तिला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.



अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी


संबंध तोडल्यानंतर आरोपीने तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याद्वारे तो तिच्याकडून पैसे उकळत होता. त्यामुळे तरुणी गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होती. तिच्या वर्तनातील बदल पाहून कुटुंबीयांनी विचारणा केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयात जाऊन आरोपीला जाब विचारला. मात्र, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी उलट वडिलांवरच हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली.



आत्महत्येची घटना


या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास ती घरी आली आणि तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बंगली येथील कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मध्यरात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला.



वडिलांचे गंभीर आरोप


पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल करून पैसे मागत होता. तिने आधीच त्याला १५ हजार रुपये दिले होते.



कॉलेज प्राचार्यांवरही आरोप


या घटनेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर प्राचार्यांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी उलट मुलीला त्याची माफी मागायला लावली, असा धक्कादायक आरोप वडिलांनी केला आहे.

Comments
Add Comment

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा