विरारमध्ये १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराच्या ब्लॅकमेलिंग आणि छळामुळे उचलले टोकाचे पाऊल

विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.



काय आहे प्रकरण?


पीडित तरुणी विरार (पूर्व) येथील नाना नानी पार्कजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच महाविद्यालयातील २१ वर्षीय अमित प्रजापती या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने हे संबंध तोडले होते. त्यानंतर अमित सतत तिला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.



अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी


संबंध तोडल्यानंतर आरोपीने तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याद्वारे तो तिच्याकडून पैसे उकळत होता. त्यामुळे तरुणी गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होती. तिच्या वर्तनातील बदल पाहून कुटुंबीयांनी विचारणा केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयात जाऊन आरोपीला जाब विचारला. मात्र, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी उलट वडिलांवरच हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली.



आत्महत्येची घटना


या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास ती घरी आली आणि तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बंगली येथील कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मध्यरात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला.



वडिलांचे गंभीर आरोप


पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल करून पैसे मागत होता. तिने आधीच त्याला १५ हजार रुपये दिले होते.



कॉलेज प्राचार्यांवरही आरोप


या घटनेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर प्राचार्यांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी उलट मुलीला त्याची माफी मागायला लावली, असा धक्कादायक आरोप वडिलांनी केला आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .