पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रिलायन्स फाउंडेशनने एक व्यापक मदत मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधं, आणि जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

पूर ओसरताच रिलायन्स फाउंडेशनचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची पाहणी करून, त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, हे समजून घेतले. यानंतर रिलायन्स रिटेलच्या सहाय्याने अन्न, वस्त्र, आणि जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण


पूरानंतर जनावरांमध्ये रोगांचा धोका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॅमोरॅजिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर या रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २२,००० जनावरांना लस देण्यात आली. यासोबतच प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटपही करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गोठ्यांमध्ये जनावरांसह राहत असलेल्या नागरिकांसाठीही अशीच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

अन्न आणि आरोग्य सुविधा उपलब्ध


पूरग्रस्त कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहे चालू करून ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, खराब झालेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित केल्या गेल्या.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि औषधांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठाही केला जात आहे.

“मध्य महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनने याआधीही पंजाब, आसाम, उत्तराखंडसह इतर राज्यांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या वेळी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात