पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रिलायन्स फाउंडेशनने एक व्यापक मदत मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधं, आणि जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.

पूर ओसरताच रिलायन्स फाउंडेशनचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वाधिक फटका बसलेल्या भागांची पाहणी करून, त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, हे समजून घेतले. यानंतर रिलायन्स रिटेलच्या सहाय्याने अन्न, वस्त्र, आणि जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण


पूरानंतर जनावरांमध्ये रोगांचा धोका लक्षात घेता, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हॅमोरॅजिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर या रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे २२,००० जनावरांना लस देण्यात आली. यासोबतच प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटपही करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील गोठ्यांमध्ये जनावरांसह राहत असलेल्या नागरिकांसाठीही अशीच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

अन्न आणि आरोग्य सुविधा उपलब्ध


पूरग्रस्त कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये, रिलायन्स फाउंडेशनने सामुदायिक स्वयंपाकगृहे चालू करून ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, खराब झालेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित केल्या गेल्या.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि औषधांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठाही केला जात आहे.

“मध्य महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनने याआधीही पंजाब, आसाम, उत्तराखंडसह इतर राज्यांतील नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या वेळी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गरजेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
Comments
Add Comment

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर