भारताचे अस्त्र क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा वेध घेणार

नवी दिल्ली : डीआरडीओने अर्थात भारतीय संरक्षण संशोधन प्रबोधिनीने अस्त्र क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती विकसित केली आहे. भारतीय हवाई दलासाठी ही आवृत्ती विकसित करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा नायनाट करण्यास सक्षम आहे.


भारताने आधी विकसित केलेले अस्त्र क्षेपणास्त्र १६० किलोमीटर पर्यंत कुठेही अचूक आणि भेदक हल्ला करण्यास सक्षम होते. अस्त्र क्षेपणास्त्राची डीआरडीओने विकसित केलेली नवी आवृत्ती २०० किलोमीटर पर्यंत कुठेही अचूक आणि भेदक हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताच्या लढाऊ विमानांतून अस्त्र क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. यामुळे भारताची लढाऊ विमानं सुरक्षित अंतरावर राहून पाकिस्तानमध्ये खोलवर अचूक आणि भेदक हल्ला करू शकणार आहे. भारतीय हवाई दल लवकरच २०० किलोमीटरचा पल्ला असलेले आधुनिक अस्त्र क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. हवाई दल ७०० अस्त्र क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. ही क्षेपणास्त्र सुखोई, तेजस एलसीए या लढाऊ विमानांवर बसवली जातील.


अस्त्र हे BVR (बियाँड व्हिज्युअल रेंज) क्षेपणास्त्र आहे, हे नजरेच्या पलीकडील लक्ष्यांचे अचूक भेद करु शकते. हे विशेषतः शत्रूच्या रडार-आधारित टोळधाडी करणाऱ्या विमानांवर आणि फायटर जेट्सवर प्रभावी ठरण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. भविष्यात पाकिस्तान-चीन या दुहेरी शत्रुच्या फायटर जेट्सचा सामना करावा लागेल त्या दृष्टीने भारताने हे क्षेपणास्त्र तयार केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारत आणि पाकिस्तानात मर्यादीत हवाई संघर्ष झालेला.



दूरूनच हवाई हल्ले केले


ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानी एअर बेस आणि दहशतवादी तळांवर लांबूनच हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सच मोठं नुकसान झालं होतं. त्यांची अनेक फायटर विमानं, अमेरिकी बनावटीच F-16, आणि चिनी जेट्स जमिनीवर, हवेतच नष्ट झाली होती. त्यांचे ड्रोन्स आणि हेरगिरी करणारी विमान दक्षिण पाकिस्तानात पडली.



पाकिस्तानकडे असलेले एअर टू एअर मिसाईल


पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून हल्ला करताना PL-15 एअर टू एअर मिसाइल डागली होती. मात्र, त्यांना त्यात य़श मिळालं नाही. भारतीय वायुसेनेचं अस्त्र मार्क-1 अतिशय सक्षम आहे. नवे अस्त्र क्षेपणास्त्र प्रचंड प्रभावी आहे. यात अॅडव्हान्स गाइडेन्स व नेव्हिगेशन सिस्टिम बसवण्यात आली आहे. या अत्याधुनिक अस्त्र प्रकल्पात डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळांनी आणि ५० हून अधिक सार्वजनिक व खासगी कंपन्यांनी, त्यातही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने महत्त्वाचं योगदान दिलं आहे.



चीनकडून विकत घेतलेल्या मिसाइल्स


पाकिस्तानी एअर फोर्सकडे अस्त्र सारख्या क्षेपणास्त्रांची संख्या कमी आहे. त्यांच्या विमानातून डागण्याच्या क्षेपणास्त्रांची रेंज १२० ते १४५ किमी. पर्यंत आहे. तर अस्त्र मार्क-2 ची रेंज 200 किलोमीटर असल्याने भारताची मारक क्षमता वाढली आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.