एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र, सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचं इशारा दिला होता. आता सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बोनस जाहीर केला आहे, ज्यामुळे संप टळला असून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी ६००० रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


तसेच, १२,५०० रुपयांची उचल घेण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो पुढील ४८ आठवड्यांपर्यंत लागू राहणार आहे.


एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून, वेळेवर पगार मिळण्यात अडथळे येत होते. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी सुरू आहे, मात्र त्यावर अजून तोडगा निघालेला नाही.


सरकारने दिवाळीपूर्वीच ही आर्थिक मदत आणि बोनस जाहीर करून कामगारांच्या रोषाला थोपवले आहे. त्यामुळे संभाव्य संप टळला असून, एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरंच गोड ठरणार आहे.

Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा