Breaking News : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी १२ वी (HSC) आणि १० वी (SSC) दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ घोषित करण्यात आले आहे.


बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील समाविष्ट आहेत.


तर, दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे.


शासनाच्या परिपत्रकानुसार, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहेत.


दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होतील.


या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.


विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन सुलभ व्हावे आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशाने या तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या आहेत. विषयनिहाय अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल