Breaking News : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी १२ वी (HSC) आणि १० वी (SSC) दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ घोषित करण्यात आले आहे.


बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षा देखील समाविष्ट आहेत.


तर, दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे.


शासनाच्या परिपत्रकानुसार, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहेत.


दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होतील.


या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.


विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन सुलभ व्हावे आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशाने या तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या आहेत. विषयनिहाय अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या