बिहारमध्ये पेच सुटला, एनडीएचे जागावाटप जाहीर


पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुसार जनता दल संयुक्त अर्थात जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी किंवा भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.





बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यात जेडीयू आणि बीजेपी (भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत.


मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम होता. भाजपने २०२० मध्ये ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप १०१ जागा लढवणार आहे. भाजपने नऊ जागांचे बलिदान मित्रपक्षांसाठी दिले आहे. यंदा एनडीएमध्ये दोन पक्ष वाढले आहेत. तर एक पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे. लोजप (आर) आणि रालोमो पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने (आर) जागावाटपात २९ जागा मिळवल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लोजप स्वबळावर लढला होता. त्यांनी १३४ जागांवर उमेदवार दिले. यातील बहुतांश जागा एनडीएमध्ये जेडीयूच्या वाट्याला गेल्या होत्या. भाजपला केवळ १ जागा जिंकता आली. पण लोजप उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे जेडीयूने जवळपास ३५ जागा गमावल्या. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जेडीयू २०२० मध्ये ४३ जागांवर आला. जेडीयूने ३५ जागा गमावल्याने भाजप एनडीएमध्ये आपोआप मोठा भाऊ झाला. एनडीएला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.


Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुल कर्णधार

मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सलामीवीर

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, FIR नोंदीत नेमकं काय?

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?

बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक

अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या

वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या