बिहारमध्ये पेच सुटला, एनडीएचे जागावाटप जाहीर


पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुसार जनता दल संयुक्त अर्थात जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी किंवा भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.





बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यात जेडीयू आणि बीजेपी (भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत.


मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम होता. भाजपने २०२० मध्ये ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप १०१ जागा लढवणार आहे. भाजपने नऊ जागांचे बलिदान मित्रपक्षांसाठी दिले आहे. यंदा एनडीएमध्ये दोन पक्ष वाढले आहेत. तर एक पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे. लोजप (आर) आणि रालोमो पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने (आर) जागावाटपात २९ जागा मिळवल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लोजप स्वबळावर लढला होता. त्यांनी १३४ जागांवर उमेदवार दिले. यातील बहुतांश जागा एनडीएमध्ये जेडीयूच्या वाट्याला गेल्या होत्या. भाजपला केवळ १ जागा जिंकता आली. पण लोजप उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे जेडीयूने जवळपास ३५ जागा गमावल्या. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जेडीयू २०२० मध्ये ४३ जागांवर आला. जेडीयूने ३५ जागा गमावल्याने भाजप एनडीएमध्ये आपोआप मोठा भाऊ झाला. एनडीएला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.


Comments
Add Comment

अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार

अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ,

धुक्यानं वाट लावली, लखनऊची टी ट्वेंटी रद्द झाली

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना

राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री

मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी