शुभमन गिलने रचला इतिहास... WTC मध्ये तोडला रोहित शर्माचा विक्रम

मुंबई: भारतीय कर्णधार शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील १० वे शतक आहे. या शतकामुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


WTC मध्ये गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम


शुभमन गिल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. गिलने या बाबतीत माजी कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडला आहे.


गिलने WTC मध्ये आतापर्यंत १० शतके झळकावली आहेत. रोहित शर्माने WTC मध्ये ९ शतके झळकावली होती. याच शतकी खेळीमुळे, शुभमन गिल WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या 'या' क्लबमध्ये सामील


शुभमन गिलने कर्णधार म्हणून २०२५ या कॅलेंडर वर्षात ५ वे कसोटी शतक पूर्ण केले आहे. या कामगिरीसह गिलने विराट कोहलीच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये गिलने विराट कोहलीची बरोबरी साधली आहे.विराटने २०१७ आणि २०१८ मध्ये दोन वेळा ही कामगिरी केली होती.



दुसऱ्या कसोटीत गिलची कामगिरी


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलने नाबाद १२९ धावांची खेळी केली. त्याने या दरम्यान १६ चौकार आणि २ षटकार मारले. गिलच्या या खेळीमुळे भारताने आपला पहिला डाव ५१८/५ धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालनेही १७५ धावांची शानदार खेळी केली.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक