'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र चित्रपटाच्या नावावरुन प्रदर्शनापूर्वीपासूनच वाद सुरु आहे. त्यामुळे दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेने चित्रपटाचे नाव बदलून पुन्हा प्रदर्शित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन कळवले आहे.


मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत,"नमस्कार! 'मना'चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत.भेटूयात!' असे स्पष्ट केले आहे.



समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक हे धार्मिक ग्रंथाचे नाव चित्रपटासाठी वापरण्यात आल्यामुळे हिंदूवादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा चित्रपट पुण्यातील धायरी भागातील अभिरूची मॉलमधील थिएटरमध्ये आणि कोथरूडमधील एका थिएटरमध्ये बंद पाडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान झाल्याने नाव बदलून पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय मृण्मयी देशपांडेने घेतला आहे.


या प्रकरणात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मृण्मयीला पाठींबा दिला आहे. तिच्या नाजूक परिस्थितीमध्ये अनेक कलाकार तिच्यासोबत उभे राहिले आहेत. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, सखी गोखले आणि इतर अनेक जणांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

ALPHA TEASER : आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्रीची चर्चा!

MUMBAI : यशराज फिल्म्सच्या बहुचर्चित 'स्पाय युनिव्हर्स'मधील आगामी 'अल्फा' (Alpha) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला

Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता