Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला


नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना २ - ३ दिवस सुट्टी देतात, पण Elite Marque या पब्लिक रिलेशन कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांसाठी एक खास भेट दिली आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सलग ९ दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे, जी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आणि आनंददायी ठरली आहे.


कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोवर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक खास ईमेल पाठवला आहे. त्या ईमेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, “या दिवाळीत ईमेल बंद ठेवा, रात्र हसत-खेळत वेळ घालवा, मिठाई खा आणि आरामात झोपा ” तसेच त्यांनी सुट्टीच्या काळात कोणताही ऑफिस ईमेल किंवा वर्क चॅट उघडण्यास मनाई केला आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ विश्रांती आणि कौटुंबिक वेळ मिळावा.


आजच्या कॉर्पोरेट युगात, जिथे अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम पॉलिसी कमी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत येण्याचे कडक नियम लागू करत आहेत, अशा काळात Elite Marque चा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी मानला जात आहे.


कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने LinkedIn वर लिहिले की, “सगळेच वर्क कल्चरवर बोलतात, पण खरं वर्क कल्चर तेच जेथे कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि आनंदाला प्राधान्य देते. Elite Marque ने आम्हाला आमच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी दिली, ही खरी दिवाळीची भेट आहे.”


सीईओ रजत ग्रोवर यांनी आपल्या संदेशात कर्मचार्‍यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टिकोनातून विश्रांती घेण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे ते सुट्टीनंतर ताज्या ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन कामाला परत येतील.


Elite Marque चा हा निर्णय इतर कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरू शकतो की, वर्क-लाइफ बॅलन्स राखणं आणि कर्मचारी कल्याणाला महत्त्व देणं यामध्ये किती फरक पडतो.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या