पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुरुषांना अगदी २० व्या वर्षीच केसगळती ची समस्या जाणवते. हि समस्या मानसिक तणावाचे कारण ठरू शकते.


केसगळतीमुळे बदलणाऱ्या लूकमुळे अनेक पुरुष कृत्रिम केसांचा वापर करतात, विग लावतात किंवा हेअर ट्रान्सप्लांटसारख्या पद्धतींचा अवलंब करतात. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, तर काही जण ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं झालं, तर केस हे शरीराचा एक सामान्य भाग आहेत. केस गळणे ही कोणतीही लाज वाटावी अशी गोष्ट नाही.


पुरुषांमध्ये केस गळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया (Androgenetic Alopecia), ज्याला सामान्य भाषेत मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटले जाते. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते – अनुवांशिकता आणि टेस्टोस्टेरॉन या पुरुष हार्मोनचा परिणाम. केसगळतीची सुरुवात डोक्याच्या मध्यभागी किंवा कपाळापासून होते आणि हळूहळू संपूर्ण टाळूपर्यंत पोहोचते.


याशिवाय पौष्टिकतेचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, रसायनांचा अति वापर, हार्मोनल बदल, आणि टाळूवरील संसर्ग यांसारखी अनेक कारणे केसगळतीला कारणीभूत ठरू शकतात.


आजच्या घडीला केस गळतीवर विविध उपचार उपलब्ध आहेत, घरगुती उपाय, औषधोपचार, विशेष तेलं, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे केस प्रत्यारोपण (Hair Transplant). मात्र कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.


शेवटी केस हे सौंदर्याचा भाग असतात. पण केस गळणे म्हणजे कमजोरी नाही, तर त्यावर योग्य उपाय आणि ते स्वीकारणे आवश्यक आहे. लुकमध्ये बदल करण्यासाठी जर कृत्रिम केस किंवा इतर पद्धतींचा वापर केला जात असेल, तर त्यामध्ये कोणतीही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. तसेच समाजानेदेखील याकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना