पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुरुषांना अगदी २० व्या वर्षीच केसगळती ची समस्या जाणवते. हि समस्या मानसिक तणावाचे कारण ठरू शकते.


केसगळतीमुळे बदलणाऱ्या लूकमुळे अनेक पुरुष कृत्रिम केसांचा वापर करतात, विग लावतात किंवा हेअर ट्रान्सप्लांटसारख्या पद्धतींचा अवलंब करतात. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, तर काही जण ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं झालं, तर केस हे शरीराचा एक सामान्य भाग आहेत. केस गळणे ही कोणतीही लाज वाटावी अशी गोष्ट नाही.


पुरुषांमध्ये केस गळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया (Androgenetic Alopecia), ज्याला सामान्य भाषेत मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटले जाते. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते – अनुवांशिकता आणि टेस्टोस्टेरॉन या पुरुष हार्मोनचा परिणाम. केसगळतीची सुरुवात डोक्याच्या मध्यभागी किंवा कपाळापासून होते आणि हळूहळू संपूर्ण टाळूपर्यंत पोहोचते.


याशिवाय पौष्टिकतेचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, रसायनांचा अति वापर, हार्मोनल बदल, आणि टाळूवरील संसर्ग यांसारखी अनेक कारणे केसगळतीला कारणीभूत ठरू शकतात.


आजच्या घडीला केस गळतीवर विविध उपचार उपलब्ध आहेत, घरगुती उपाय, औषधोपचार, विशेष तेलं, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे केस प्रत्यारोपण (Hair Transplant). मात्र कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.


शेवटी केस हे सौंदर्याचा भाग असतात. पण केस गळणे म्हणजे कमजोरी नाही, तर त्यावर योग्य उपाय आणि ते स्वीकारणे आवश्यक आहे. लुकमध्ये बदल करण्यासाठी जर कृत्रिम केस किंवा इतर पद्धतींचा वापर केला जात असेल, तर त्यामध्ये कोणतीही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. तसेच समाजानेदेखील याकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत