तालिबानसोबतच्या भीषण संघर्षात १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, अफगाण सैन्याने सीमेवरील अनेक चौक्यांवर केला कब्जा

कराची :अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष झाला आहे. ताज्या अहवालानुसार, या चकमकीत १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून, अफगाण सैनिकांनी सीमेवरील पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे.


हा संघर्ष मुख्यतः पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला विभागणाऱ्या ड्युरंड लाइन जवळील अनेक भागांमध्ये झाला पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूल येथे हवाई हल्ला केल्यानंतर तालिबानने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला.


पाकिस्तानने ९ ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूदला निशाणा बनवत अनेक हवाई हल्ले केले होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानने २०१ खालिद विन वलीद आर्मी कोरने ११ ऑक्टोबरच्या रात्री उिरा नंगरहर आणि कुनार प्रांतात ड्युरंड लाईनजवळ पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला सुरू केला.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी लढवय्यांनी अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या असून, पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यावी लागली आहे. हा वाढता तणाव दोन्ही देशांमधील संबंधांना अधिक बिघडवत आहे, ज्याचे मूळ कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया आणि वादग्रस्त ड्युरंड लाइन आहे.

Comments
Add Comment

Terrorist Pannu: खलिस्तानी दहशतवादीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाला अमेरिकेत २४ वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पन्नूच्या हत्येचा कट

ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे.

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले