शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांत तब्ब्ल १०८ मोठे जाहिरात फलक गॅस कटरच्या साहाय्याने तोडत जमीनदोस्त करण्यात आले आहेत.


वसई - विरार महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक लावायचे असल्यास पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा जाहिरातदारांना अधिकृत परवानगी देत पालिका जाहिरात कर वसूल करते. पालिकेने पावसाळ्याच्या आधी धोकादायक जाहिरात फलक गॅस कटरच्या सहाय्याने तोडत कारवाई केली होती. तर नुकताच गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान पालिका हद्दीत शेकडो मंडळांतर्फे अनधिकृत जाहिरातबाजी, बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच राजकीय पक्षांतर्फे देखिल अनधिकृत जाहीरात फलक लावण्यात आले होते. अशा जाहिरात फलकांवर कारवाई करत पालिकेने दंड वसूल केला आहे.


दीड लाखांचा दंड वसूल केल्याचे पालिकेने सांगितले. यासह एकूण १० जाहिरात दारांवर या मागील आठवडाभरात गुन्हे दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, शहरात आजही अनधिकृत फलक उभे आहेत. अशा जाहिरात फलकांवर पालिकेतर्फे कारवाई सुरु आहे. अनधिकृत फलकांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येत असल्याचे जाहिरात विभागाने सांगितले. सध्या चालू वर्षात पालिकेने ७०४ जाहिरात फलकांना परवानगी दिली आहे.


मात्र तरीही या व्यतिरिक्त अनेक अनधिकृत जाहिरात फलक उभे असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त होत आहेत. त्यानुसार पालिकेने नुकताच कारवाई हाती घेतली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये जाणारे लहान रस्ते यावरील जाहिराती देखील कारवाई करत तोडण्यात येत आहेत. मागील सहा महिन्यात १०८ मोठे जाहिरात फलक म्हणजेच होर्डिंग्स हे गॅस कटरच्या सहाय्याने तोडून पाडण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या