IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे. आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. आफ्रिकेने हे आव्हान ३ विकेट राखत पूर्ण केले.


पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ४९.४ षटकांत सर्वबाद २५१ धावा केल्या. रिचा घोषने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. या सामन्यात द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी २५२ धावांची आवश्यकता होती. याचवेळी द. आफ्रिकेची डी क्लर्क धावून आली. तिने ८४ धावांची तुफान खेळी केली. त्याच्या जोरावर आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला.


नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोलव्हार्टने (Laura Wolvaardt) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात संथ झाली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतीका रावळने (Pratika Rawal) ५५ धावांची सलामी दिली, मात्र मानधना २३ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली आणि एका क्षणी भारताची अवस्था ७ बाद १५३ अशी झाली होती. अशा परिस्थितीत, ऋचा घोषने डाव सावरत दमदार फलंदाजी केली. तिने केवळ ७७ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. तिला स्नेह राणा (Sneh Rana) (२४ चेंडूत ३३) हिने चांगली साथ दिली. या दोघांनी ८८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव ४९.५ षटकांत २५१ धावांपर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने ३ तर मारिझाने कॉप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील