IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे. आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. आफ्रिकेने हे आव्हान ३ विकेट राखत पूर्ण केले.


पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ४९.४ षटकांत सर्वबाद २५१ धावा केल्या. रिचा घोषने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. या सामन्यात द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी २५२ धावांची आवश्यकता होती. याचवेळी द. आफ्रिकेची डी क्लर्क धावून आली. तिने ८४ धावांची तुफान खेळी केली. त्याच्या जोरावर आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला.


नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोलव्हार्टने (Laura Wolvaardt) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात संथ झाली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतीका रावळने (Pratika Rawal) ५५ धावांची सलामी दिली, मात्र मानधना २३ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली आणि एका क्षणी भारताची अवस्था ७ बाद १५३ अशी झाली होती. अशा परिस्थितीत, ऋचा घोषने डाव सावरत दमदार फलंदाजी केली. तिने केवळ ७७ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. तिला स्नेह राणा (Sneh Rana) (२४ चेंडूत ३३) हिने चांगली साथ दिली. या दोघांनी ८८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव ४९.५ षटकांत २५१ धावांपर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने ३ तर मारिझाने कॉप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात