IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे. आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेटपटू रिचा घोषच्या ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. आफ्रिकेने हे आव्हान ३ विकेट राखत पूर्ण केले.


पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ४९.४ षटकांत सर्वबाद २५१ धावा केल्या. रिचा घोषने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. या सामन्यात द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी २५२ धावांची आवश्यकता होती. याचवेळी द. आफ्रिकेची डी क्लर्क धावून आली. तिने ८४ धावांची तुफान खेळी केली. त्याच्या जोरावर आफ्रिकेने या सामन्यात ३ विकेट राखत विजय मिळवला.


नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोलव्हार्टने (Laura Wolvaardt) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात संथ झाली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतीका रावळने (Pratika Rawal) ५५ धावांची सलामी दिली, मात्र मानधना २३ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली आणि एका क्षणी भारताची अवस्था ७ बाद १५३ अशी झाली होती. अशा परिस्थितीत, ऋचा घोषने डाव सावरत दमदार फलंदाजी केली. तिने केवळ ७७ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. तिला स्नेह राणा (Sneh Rana) (२४ चेंडूत ३३) हिने चांगली साथ दिली. या दोघांनी ८८ धावांची भागीदारी करून भारताचा डाव ४९.५ षटकांत २५१ धावांपर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने ३ तर मारिझाने कॉप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे