पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात पुणे मेट्रो राज्यात अव्वल ठरली आहे. आतापर्यंत सुमारे ७३.७५ टक्क्यांपर्यंत डिजिटल व्यवहार केल्याचे आकडेवारीतून समोर आले. त्यामुळे स्मार्ट पुणेकरांची स्मार्ट दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुण्यातील मेट्रो मार्गिका विस्ताराबरोबर प्रवाशांना पायाभूत आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात प्रवाशांना कागदी व्यवहारांना दूर ठेवून (रोख व्यवहार) ‘आपली मेट्रो’ मोबाइल ॲप, क्यूआर कोड स्कॅनर, यूपीआय, महामेट्रो कार्ड, व्हाॅट्सॲप आणि किऑस्क अशा डिजिटल माध्यमांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर स्थानकांवर तिकीट केंद्र निर्माण करून थेट मशिनच्या माध्यमातून थेट रोखीने व्यवहाराची सुविधाही निर्माण केली आहे. मात्र, प्रवाशांकडून डिजिटल व्यवहारांना पसंती दिली जात आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच