पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात पुणे मेट्रो राज्यात अव्वल ठरली आहे. आतापर्यंत सुमारे ७३.७५ टक्क्यांपर्यंत डिजिटल व्यवहार केल्याचे आकडेवारीतून समोर आले. त्यामुळे स्मार्ट पुणेकरांची स्मार्ट दिशेने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुण्यातील मेट्रो मार्गिका विस्ताराबरोबर प्रवाशांना पायाभूत आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात प्रवाशांना कागदी व्यवहारांना दूर ठेवून (रोख व्यवहार) ‘आपली मेट्रो’ मोबाइल ॲप, क्यूआर कोड स्कॅनर, यूपीआय, महामेट्रो कार्ड, व्हाॅट्सॲप आणि किऑस्क अशा डिजिटल माध्यमांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर स्थानकांवर तिकीट केंद्र निर्माण करून थेट मशिनच्या माध्यमातून थेट रोखीने व्यवहाराची सुविधाही निर्माण केली आहे. मात्र, प्रवाशांकडून डिजिटल व्यवहारांना पसंती दिली जात आहे.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक