शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची पुढील 'सर्वोच्च' सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय देत त्यांनाच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने हंगामी स्थगिती दिलेली नाही. पूर्ण सुनावणीअंती निर्णय देऊ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी निवडणूक प्रक्रियांमध्ये होत आहे. सध्याची स्थिती बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाकडेच असेल, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत.


राज्यात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह याचा वापर होऊ नये यासाठी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण सर्वोच्च न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नाही तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती पण देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

'भाषा शिकवा पण भाषेसाठी हिंसा करू नका'

नागपूर : महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर वाढत्या हिंसाचारावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे.

शिंदे माझे मित्र, आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रित लढू - देवेंद्र फडणवीस

नागपूर : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६