डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

मुंबई : आरबीआयने आजपासून ऑनलाईन पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोन पे, पेटीएम आणि जीपे सारख्या यूपीआय अ‍ॅपसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या नवीन बदलाबद्दल ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही चर्चा करण्यात येत आहे.


यूपीआयच्या या नवीन सुविधेमध्ये व्यवहाराचे प्रमाणीकरण भारत सरकारच्या आधार कार्ड प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केले जाणार आहे. ज्यात वापरकर्त्याचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार कार्डवरील माहितीसोबत जुळवून पाहिला जाईल आणि त्यानंतर व्यवहाराला परवानगी मिळणार आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन बदलामुळे व्यवहार सुरक्षित आणि अधिक सोपा होणार आहे.


आजपर्यंत यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना केवळ पिनकोडचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा वापरकर्त्यांचे पिनकोड हॅक होवून बॅंक खात्यातील रक्कम चोरली गेली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने आजपासून फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याच्या आधाराने बायोमेट्रिक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्याच्या फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय व्यवहार केला जाऊ शकत नाही. हा एक सुरक्षित व्यवहाराचा उत्तम पर्याय तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका एक्सिट पोलनंतर शेअर बाजारात 'कुशन' सेन्सेक्स २५५.६१ व निफ्टी ६४ अंकाने उसळला

मोहित सोमण: जागतिक स्थितीसह भारतातील राजकीय स्थितीत सापेक्षता निर्माण झाल्याने सकाळच्या सत्रात शेअर बाजारात

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य