डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

मुंबई : आरबीआयने आजपासून ऑनलाईन पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोन पे, पेटीएम आणि जीपे सारख्या यूपीआय अ‍ॅपसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या नवीन बदलाबद्दल ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही चर्चा करण्यात येत आहे.


यूपीआयच्या या नवीन सुविधेमध्ये व्यवहाराचे प्रमाणीकरण भारत सरकारच्या आधार कार्ड प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केले जाणार आहे. ज्यात वापरकर्त्याचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार कार्डवरील माहितीसोबत जुळवून पाहिला जाईल आणि त्यानंतर व्यवहाराला परवानगी मिळणार आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन बदलामुळे व्यवहार सुरक्षित आणि अधिक सोपा होणार आहे.


आजपर्यंत यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना केवळ पिनकोडचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा वापरकर्त्यांचे पिनकोड हॅक होवून बॅंक खात्यातील रक्कम चोरली गेली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने आजपासून फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याच्या आधाराने बायोमेट्रिक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्याच्या फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय व्यवहार केला जाऊ शकत नाही. हा एक सुरक्षित व्यवहाराचा उत्तम पर्याय तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंची मुंबई : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय