डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

मुंबई : आरबीआयने आजपासून ऑनलाईन पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोन पे, पेटीएम आणि जीपे सारख्या यूपीआय अ‍ॅपसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या नवीन बदलाबद्दल ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही चर्चा करण्यात येत आहे.


यूपीआयच्या या नवीन सुविधेमध्ये व्यवहाराचे प्रमाणीकरण भारत सरकारच्या आधार कार्ड प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केले जाणार आहे. ज्यात वापरकर्त्याचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार कार्डवरील माहितीसोबत जुळवून पाहिला जाईल आणि त्यानंतर व्यवहाराला परवानगी मिळणार आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन बदलामुळे व्यवहार सुरक्षित आणि अधिक सोपा होणार आहे.


आजपर्यंत यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना केवळ पिनकोडचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा वापरकर्त्यांचे पिनकोड हॅक होवून बॅंक खात्यातील रक्कम चोरली गेली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने आजपासून फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याच्या आधाराने बायोमेट्रिक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्याच्या फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय व्यवहार केला जाऊ शकत नाही. हा एक सुरक्षित व्यवहाराचा उत्तम पर्याय तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

माणिकराव कोकाटे यांची तात्पुरती अटक टळली, मात्र आमदारकीवर टांगती तलवार! कोर्टाच्या निर्णयात काय म्हंटलय?

नाशिक : सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय

जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय नाही, सिंगापूर पोलिसांचा खुलासा

सिंगापूर : भारतीय नागरिक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत. या

राज्यातील २९ महानगरपालिकेतील समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक पार ;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती...

विदर्भ, मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी उपस्थित... राष्ट्रवादी काँग्रेस आणि

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते