डिजिटल व्यवहारातील धोका कमी होणार, आरबीआयच्या नियमावलीत मोठे बदल !

मुंबई : आरबीआयने आजपासून ऑनलाईन पेमेंटसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोन पे, पेटीएम आणि जीपे सारख्या यूपीआय अ‍ॅपसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या नवीन बदलाबद्दल ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्येही चर्चा करण्यात येत आहे.


यूपीआयच्या या नवीन सुविधेमध्ये व्यवहाराचे प्रमाणीकरण भारत सरकारच्या आधार कार्ड प्रणालीमध्ये नोंदवलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे केले जाणार आहे. ज्यात वापरकर्त्याचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट त्यांच्या आधार कार्डवरील माहितीसोबत जुळवून पाहिला जाईल आणि त्यानंतर व्यवहाराला परवानगी मिळणार आहे. आरबीआयने केलेल्या या नवीन बदलामुळे व्यवहार सुरक्षित आणि अधिक सोपा होणार आहे.


आजपर्यंत यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना केवळ पिनकोडचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे अनेकदा वापरकर्त्यांचे पिनकोड हॅक होवून बॅंक खात्यातील रक्कम चोरली गेली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरबीआयने आजपासून फिंगर प्रिंट आणि चेहऱ्याच्या आधाराने बायोमेट्रिक करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्याच्या फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय व्यवहार केला जाऊ शकत नाही. हा एक सुरक्षित व्यवहाराचा उत्तम पर्याय तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दाऊदच्या जवळच्या माणसावर ईडीच्या धाडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम मुंबईतून परदेशी पळून गेला त्याला काही दशकं उलटली. पण वेगवेगळ्या माणसांकरवी

जागतिक बँकेने चीनच्या विकासाचा अंदाज ४.८% पर्यंत वाढवला

जागतिक बँकेने या वर्षी चीनची अर्थव्यवस्था ४.८% ने वाढेल असा अंदाज वर्तवला  अमेरिकेने चिनी आयातीवरील शुल्क १००%

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होणार, जागांच्या किंमतीवर 'अशाप्रकारे' परिणाम होणार

नवी मुंबई:बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) चे उद्घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदी

Top Stocks to Buy Today: जबरदस्त भविष्यकालीन कमाईसाठी 'हे' शेअर लवकर खरेदी करा Motilal Oswal कडून या शेअर्सला बाय कॉल

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने आपला नवा अहवाल सादर केला आहे. अभ्यासाच्या आधारे हे पुढील शेअर्स

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

RBI Update: २८००० कोटी रूपयांच्या सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूकीची चालून आली संधी १० ऑक्टोबरला होणार विक्री

प्रतिनिधी:अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय भांडवली बाजारात हस्तक्षेप करत असते. या धोरणाचा भाग म्हणून