दिवाळीच्या खरेदीमागचं शास्त्र आणि श्रद्धा : जाणून घ्या काय खरेदी करावं!

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीमध्ये पारंपरिक खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.


ही परंपरा केवळ आर्थिक लाभासाठी नव्हे, तर धार्मिक श्रद्धांमुळेही महत्त्वाची मानली जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीचे पूजन करून आरोग्य व संपत्तीचा आशीर्वाद मागितला जातो. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या काळात कोणकोणत्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते, हे जाणून घ्या.


लक्ष्मी - गणेश मूर्ती : दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती विकत घेणे शुभ मानले जाते. लक्ष्मी देवी ही संपत्तीची, तर गणपती बुद्धीचे देवता मानले जातात. या मूर्ती दिवाळी पूजेसाठी आवश्यक समजल्या जातात आणि समृद्धीचे प्रतीक ठरतात.


झाडू : अनेकजण दिवाळीच्या खरेदीमध्ये नवीन झाडू घेण्याला प्राधान्य देतात. झाडू देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती घरात शुद्धता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते. त्यामुळे झाडू खरेदी ही एक शुभ परंपरा म्हणून रूढ झाली आहे.


दिवे (तेलाचे/मातीचे दिवे) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. घरभर दिवे लावून अंधार दूर केला जातो. दिव्यांच्या प्रकाशात सकारात्मक ऊर्जा फुलते आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते, असा समज आहे. दिवे ज्ञान, विजय आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.


नारळ : पारंपरिक पूजेमध्ये नारळाचा विशेष मान असतो. दिवाळीच्या पूजेसाठी नारळ अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते. काहीजण तो तिजोरीत ठेवून सततची समृद्धी साधण्याचा विश्वास ठेवतात.


दिवाळीचा सण केवळ रोषणाईचा आणि मिठाईचा नसून, श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक सुबत्तेचा संगम आहे. या काळात केलेली खरेदी फक्त वस्तू मिळवण्यापुरती मर्यादित नसून, तिच्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना