दिवाळीच्या खरेदीमागचं शास्त्र आणि श्रद्धा : जाणून घ्या काय खरेदी करावं!

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीमध्ये पारंपरिक खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.


ही परंपरा केवळ आर्थिक लाभासाठी नव्हे, तर धार्मिक श्रद्धांमुळेही महत्त्वाची मानली जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीचे पूजन करून आरोग्य व संपत्तीचा आशीर्वाद मागितला जातो. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या काळात कोणकोणत्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते, हे जाणून घ्या.


लक्ष्मी - गणेश मूर्ती : दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती विकत घेणे शुभ मानले जाते. लक्ष्मी देवी ही संपत्तीची, तर गणपती बुद्धीचे देवता मानले जातात. या मूर्ती दिवाळी पूजेसाठी आवश्यक समजल्या जातात आणि समृद्धीचे प्रतीक ठरतात.


झाडू : अनेकजण दिवाळीच्या खरेदीमध्ये नवीन झाडू घेण्याला प्राधान्य देतात. झाडू देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती घरात शुद्धता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते. त्यामुळे झाडू खरेदी ही एक शुभ परंपरा म्हणून रूढ झाली आहे.


दिवे (तेलाचे/मातीचे दिवे) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. घरभर दिवे लावून अंधार दूर केला जातो. दिव्यांच्या प्रकाशात सकारात्मक ऊर्जा फुलते आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते, असा समज आहे. दिवे ज्ञान, विजय आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.


नारळ : पारंपरिक पूजेमध्ये नारळाचा विशेष मान असतो. दिवाळीच्या पूजेसाठी नारळ अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते. काहीजण तो तिजोरीत ठेवून सततची समृद्धी साधण्याचा विश्वास ठेवतात.


दिवाळीचा सण केवळ रोषणाईचा आणि मिठाईचा नसून, श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक सुबत्तेचा संगम आहे. या काळात केलेली खरेदी फक्त वस्तू मिळवण्यापुरती मर्यादित नसून, तिच्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे.

Comments
Add Comment

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु