दिवाळीच्या खरेदीमागचं शास्त्र आणि श्रद्धा : जाणून घ्या काय खरेदी करावं!

मुंबई : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीमध्ये पारंपरिक खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.


ही परंपरा केवळ आर्थिक लाभासाठी नव्हे, तर धार्मिक श्रद्धांमुळेही महत्त्वाची मानली जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीचे पूजन करून आरोग्य व संपत्तीचा आशीर्वाद मागितला जातो. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या काळात कोणकोणत्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते, हे जाणून घ्या.


लक्ष्मी - गणेश मूर्ती : दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती विकत घेणे शुभ मानले जाते. लक्ष्मी देवी ही संपत्तीची, तर गणपती बुद्धीचे देवता मानले जातात. या मूर्ती दिवाळी पूजेसाठी आवश्यक समजल्या जातात आणि समृद्धीचे प्रतीक ठरतात.


झाडू : अनेकजण दिवाळीच्या खरेदीमध्ये नवीन झाडू घेण्याला प्राधान्य देतात. झाडू देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती घरात शुद्धता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते. त्यामुळे झाडू खरेदी ही एक शुभ परंपरा म्हणून रूढ झाली आहे.


दिवे (तेलाचे/मातीचे दिवे) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. घरभर दिवे लावून अंधार दूर केला जातो. दिव्यांच्या प्रकाशात सकारात्मक ऊर्जा फुलते आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते, असा समज आहे. दिवे ज्ञान, विजय आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.


नारळ : पारंपरिक पूजेमध्ये नारळाचा विशेष मान असतो. दिवाळीच्या पूजेसाठी नारळ अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते. काहीजण तो तिजोरीत ठेवून सततची समृद्धी साधण्याचा विश्वास ठेवतात.


दिवाळीचा सण केवळ रोषणाईचा आणि मिठाईचा नसून, श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक सुबत्तेचा संगम आहे. या काळात केलेली खरेदी फक्त वस्तू मिळवण्यापुरती मर्यादित नसून, तिच्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे.

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये