जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव


पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे. डहाणू नगर परिषदेत सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण तर महत्त्वपूर्ण अशा पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.


सन २०१९ मध्ये झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या आरक्षणात डहाणू नगराध्यक्षपद सर्वसाधारण म्हणून आरक्षित होते. आगामी निवडणुकासाठी आता झालेल्या सोडतीत या नगर परिषदेसाठी पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जव्हार नगर परिषदेत या आधी ओबीसी साधारण असे आरक्षण होते. सोमवारी निघालेल्या आरक्षणात जव्हारमध्ये सर्वसामान्य स्त्री असे आरक्षण पडले आहे. पालघर नगर परिषदेत यापूर्वी सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण होते.


आता हे आरक्षण ओबीसी अर्थात नागरिकांचा मागसवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान, डहाणू, पालघर आणि जव्हार नगर परिषदेवर २०१९ मध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात आली होती. त्यावेळी डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत, जव्हारमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पटेल आणि पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या डॉ. उज्ज्वला काळे निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता तिन्ही नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यामुळे तिथे आता प्रशासक कार्यरत आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, प्रभागाचे आरक्षण देखील ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहावयास मिळणार आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे