मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत, मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा - सरनाईक

मुंबई : ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर पर्यंत तर मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे निर्देश परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ते या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असलेल्या ठाणे व मिरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापुरबावडी ते गायमुख या १०.३२ किलोमीटर मार्गाच्या सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे काम ३१ डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे व मिरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी. विशेषतः मिरा -भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

*मेट्रो पुलाच्या खाली उद्याने विकसित करा..*

याबरोबरच मेट्रोच्या पुलाचे काम करत असताना त्याखालील मोकळ्या जागेमध्ये भविष्यात अतिक्रमण होऊन ते विद्रूप होऊ नये, यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. त्या जागांची चांगल्या प्रकारे देखभाल कराता यावी, यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्था नेमण्यात याव्यात अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

याबरोबरच डोंगरी व मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेडच्या प्रकल्पाबाबत देखील या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात ठाणे व मिरा -भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे द्यावीत, जेणेकरून तेथे त्या गावची संस्कृती आणि परंपरा या दोन्हीची ओळख निर्माण होईल! असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध