बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू





बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन  झाले आणि डोंगरावरून कोसळलेल्या प्रचंड मोठ्या दरडीखाली एक खासगी बस दबल्याने १५प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील बल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge) ही दुर्दैवी घटना घडली. एका खासगी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस मरोतनहून घुमारवीकडे  जात होती. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असतानाच अचानक पहाडीचा मोठा भाग कोसळला. मोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट बसवर कोसळल्याने बस पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबून गेली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू करण्यात आले.


या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


?feature=share

बसमध्ये अजूनही काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या