वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली आहे. प्रभाग रचनेवर प्राप्त १६० हरकती व सूचनांवर आयोगाने निर्णय दिला असून, त्यानुसार नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेली अंतिम प्रभाग रचना पालिकेने सोमवारी प्रसिद्ध केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना, मतदार यादी, नगराध्यक्ष तसेच अध्यक्ष पदाचे आरक्षण असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. वसई-विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता. या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती.


या मुदतीत महापालिकेकडे १६० हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या. प्राप्त हरकती व सूचनांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी ३ ऑक्टोबर रोजी वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेस मान्यता दिल्याचे पत्र नगरविकास विभागाला दिले आहे. त्यानुसार पालिकेने सोमवारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे.


Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील