लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसानिलंगा राष्ट्रीय महामार्गावर आज घडलेल्या भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला.बोलेरो गाडी आणि ट्रकच्या दरम्यान आलेल्या दुचाकीला दोन्ही वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. . घटनास्थळी स्थानिक व वाहनांनी गर्दी केली होती, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला आहे.


औसा शहरातील पोतदार शाळेसमोर ही दुर्घटना घडली. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी भाऊ प्रसाद शिंदे आणि गायत्री शिंदे हे दुचाकीवरून लातूरकडे निघाले होते. लातूरकडे जाणाऱ्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने बोलेरोने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा तोल जाऊन दोघे रस्त्यावर पडले, आणि त्याच वेळी ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर बोलेरो आणि ट्रक दोन्ही वाहनांचे चालक वाहनांसह घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून सध्या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी रेवण धमाले यांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक