दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी 12 हजार विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, 4 नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून यामधून देशातील रेल्वे सेवा विस्तारित आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, दिवाळी आणि छटसारख्या सणांच्या काळात देशभरात 1200 विशेष गाड्यांद्वारे एकूण 12 हजार गाड्या चालवल्या जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही व प्रवास सुलभ होईल. याशिवाय, आजच्या कॅबिनेट बैठकीत चार नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प 3 ते 5 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, भारत आता अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूक करणारा देश ठरला आहे. गेल्या १० वर्षांत रेल्वे क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आलेले 4 नवीन रेल्वे प्रकल्प देशातील महत्त्वाच्या सात रेल्वे कॉरिडॉरवर आधारित आहेत. हे कॉरिडॉर सध्या एकूण रेल्वे वाहतुकीच्या सुमारे 41 टक्के भाराचे वहन करतात.


या कॉरिडॉरमध्ये रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन मार्ग जोडण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता या कॉरिडॉरमध्ये किमान 4 ट्रॅक, आणि शक्य असल्यास 6 ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, देशात विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात असताना, लॉजिस्टिक खर्चातही घट होत आहे. आपल्यासारख्या लोकसंख्या व अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या देशांमध्ये रेल्वे प्रणालीवर भर दिला जातो कारण ती पर्यावरणपूरक, ऊर्जासक्षम आणि खर्चबचतीस मदत करणारी आहे.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.