धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत

मोहन भागवत : ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'आपण सर्व हिंदू आहोत. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. धर्म किंवा भाषा काहीही असो, आपण सर्व एकच आहोत,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. रविवारी मध्य प्रदेशातील सतना येथे मेहेर शाह दरबाराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते. भागवत पुढे म्हणाले, "आज आपण स्वतःला वेगळे समजतो, पण वास्तव हे आहे की, आपण सर्व एकच आहोत. आपण कोणत्याही धर्म, भाषेचे किंवा प्रदेशाचे असलो तरी आपण हिंदू आहोत. आपल्यामध्ये फूट पाडणारे इंग्रज होते.


आपण स्वतःकडे आध्यात्मिक आरशातून पाहिल्यास आपण एकच आहोत, हे जाणवेल. अहंकार सोडून आत्मपरीक्षण केल्यास समाजात परिवर्तन येईल. खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचे आध्यात्मिक ज्ञान दैनंदिन जीवनात लागू केले पाहिजे. भारत जगाला शांती आणि समृद्धीचा संदेश देतो. "भागवत पुढे म्हणाले," जे लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत, ते परदेशात जातात, तेव्हा संपूर्ण जग त्यांना हिंदू मानते. त्यांनी कितीही नाकारले तरी, सत्य हेच आहे की, ते हिंदू आहेत.

Comments
Add Comment

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Airtel Business Latest News: एअरटेल बिझनेसने इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (IRSOC) साठी बहु-वर्षीय करार जिंकला

एअरटेल एक ग्रीनफील्ड, बहु-स्तरीय, सायबरसुरक्षा 24x7x365 संरक्षण परिसंस्थेची रचना, बांधणी, अंमलबजावणी आणि संचालन करेल

डीपी वर्ल्डने हैदराबादची पहिली रीफर रेल फ्रेट सर्व्हिस न्हावा शेवा येथे सुरू केली

एक उपाय जो माल रस्त्यापासून रेल्वेपर्यंत नेतो आणि त्याचबरोबर खात्रीशीर जहाज कनेक्टिव्हिटी प्रदान करतो,

आधार कार्डच्या शुल्कात वाढ; नाव, पत्ता बदलण्यासाठी ७५ रुपये मोजावे लागणार

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

‘स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही’

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ करा अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील हजारो