मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे मास्टर प्लॅन असून, त्यांच्याकडून तिकीटवाढीशिवाय मेट्रोच्या जागेत जाहिराती लावणे, स्थानकातील जागा भाड्याने देणे, अशा अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सदर पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.


मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा म्हणून एमएमआरडीए आणि रिलायन्सने खासगी-सार्वजनिक भागिदारीतून सुमारे ११ किलोमीटर लांबीची घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिका २०१४ मध्ये कार्यान्वित केली आहे.


या मेट्रो मार्गिकेने दररोज जवळपास पाच लाख मुंबईकर प्रवास करत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तरीही मेट्रो तोट्यात धावत आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि मेट्रो-वन प्रशासन तिकीट वाढवण्याबाबत विचार करत होते, मात्र तो पर्याय मागे पडला असून, एमएमआरडीएने आता तिकिटाशिवाय इतर मार्गाने उत्पन्न कसे वाढवता येईल, त्याबाबत विचार सुरू केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.त्याबाबत अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे अभ्यास गटाकडून काय अहवाल येणार, त्यात काय बाबी समोर येतील, त्यावर पुढील निर्णय ठरणार आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच