मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे मास्टर प्लॅन असून, त्यांच्याकडून तिकीटवाढीशिवाय मेट्रोच्या जागेत जाहिराती लावणे, स्थानकातील जागा भाड्याने देणे, अशा अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सदर पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.


मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा म्हणून एमएमआरडीए आणि रिलायन्सने खासगी-सार्वजनिक भागिदारीतून सुमारे ११ किलोमीटर लांबीची घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिका २०१४ मध्ये कार्यान्वित केली आहे.


या मेट्रो मार्गिकेने दररोज जवळपास पाच लाख मुंबईकर प्रवास करत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तरीही मेट्रो तोट्यात धावत आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि मेट्रो-वन प्रशासन तिकीट वाढवण्याबाबत विचार करत होते, मात्र तो पर्याय मागे पडला असून, एमएमआरडीएने आता तिकिटाशिवाय इतर मार्गाने उत्पन्न कसे वाढवता येईल, त्याबाबत विचार सुरू केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.त्याबाबत अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे अभ्यास गटाकडून काय अहवाल येणार, त्यात काय बाबी समोर येतील, त्यावर पुढील निर्णय ठरणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही