दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण भूस्खलनामुळे (Landslide) मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २३ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


मिरिक, दार्जिलिंग आणि जलपाईगुडी या भागांना या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगर कोसळून अनेक ठिकाणी भूस्खलन झाले.


मिरिक परिसरात सर्वाधिक हानी झाली आहे. दुधिया येथे बालासन नदी वरील लोखंडी पूल (Iron Bridge) कोसळल्याने मिरिक आणि सिलीगुडी/कुर्सियांगचा थेट संपर्क तुटला आहे. भूस्खलनामुळे दार्जिलिंगला मैदानी भागाशी जोडणारे अनेक प्रमुख रस्ते, जसे की रोहिणी रोड आणि राष्ट्रीय महामार्ग १० (NH10), बंद झाले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.


राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक आणि जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज, ६ ऑक्टोबरला उत्तर बंगालचा दौरा करणार आहेत. त्या बाधित भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतील आणि मदत कार्याची दिशा ठरवतील. हवामान विभागाने या भागात आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला