नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा


नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता दररोज दोन वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते दिल्ली विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून,औद्योगिक, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डयाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी १२ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार करत ही विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने दि.१६ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. १८० आसनांचे विमान असून उद्योजक आणि व्यावसायिकांना ही विमानसेवा लाभदायी ठरेल. एका दिवसात दिल्लीतील कामे आटोपल्यानंतर नाशिकला परत येणे शक्य होईल. तसेच नाशकात अनेक पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी या कंपन्यांना ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ कोटींपेक्षा अधिक भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर भारतातून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांसाठी या विमानसेवेचा चांगलाच लाभ होईल. दरम्यान, इतर मार्गांवरही विमानसेवा सुरु होणार आहेत.सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांमध्ये जाण्यासाठी नाशिकहून विमानसेवा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. आता इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दि. २८ ऑक्टोबरपासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी नाशिक-इंदूर-जयपूर तसेच नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.


विमानतळ सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न


नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकचे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्याबरोबरच जास्तीतजास्त शहरांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल


या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय, पर्यटन वाढण्याबरोबरच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल.यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. - मनीष रावल, उद्योजक ,उपाध्यक्ष निमा, विमान वाहतूक समिती अध्यक्ष, एमएसीसीआयए महाराष्ट्र आणि आयमा



Comments
Add Comment

पर्यटन क्षेत्रात जगभरात ९ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती ?

दिल्ली(वृत्तसंस्था): पुढील १० वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र ९ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून