नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा


नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता दररोज दोन वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते दिल्ली विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून,औद्योगिक, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डयाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी १२ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार करत ही विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने दि.१६ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. १८० आसनांचे विमान असून उद्योजक आणि व्यावसायिकांना ही विमानसेवा लाभदायी ठरेल. एका दिवसात दिल्लीतील कामे आटोपल्यानंतर नाशिकला परत येणे शक्य होईल. तसेच नाशकात अनेक पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी या कंपन्यांना ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ कोटींपेक्षा अधिक भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर भारतातून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांसाठी या विमानसेवेचा चांगलाच लाभ होईल. दरम्यान, इतर मार्गांवरही विमानसेवा सुरु होणार आहेत.सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांमध्ये जाण्यासाठी नाशिकहून विमानसेवा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. आता इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दि. २८ ऑक्टोबरपासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी नाशिक-इंदूर-जयपूर तसेच नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.


विमानतळ सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न


नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकचे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्याबरोबरच जास्तीतजास्त शहरांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल


या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय, पर्यटन वाढण्याबरोबरच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल.यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. - मनीष रावल, उद्योजक ,उपाध्यक्ष निमा, विमान वाहतूक समिती अध्यक्ष, एमएसीसीआयए महाराष्ट्र आणि आयमा



Comments
Add Comment

Navi Mumbai Airport : परदेशवारीसाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज! एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा; सिडकोची मोठी घोषणा

नवी मुंबई : नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी सिडकोने दिली आहे. नवी मुंबई आता केवळ मुंबईचे उपनगर न

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन