कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे. अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जाहीर केले आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यानंतर १० आणि ११ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पुरवणी मागण्यांवर ११ डिसेंबर रोजी मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील. अधिवेशनाच्या कामकाजाला १३ आणि १४ डिसेंबर रोजी सुटी असेल. दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.


महाराष्ट्रात पुढील काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


अधिवेशनाआधी परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठक होईल. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचे अंतिम नियोजन केले जाईल. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.


Comments
Add Comment

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

अमित शाहांचा अहिल्यानगर दौरा, रात्री बंद दाराआड मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी अमित

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध