कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे. अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जाहीर केले आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यानंतर १० आणि ११ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पुरवणी मागण्यांवर ११ डिसेंबर रोजी मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील. अधिवेशनाच्या कामकाजाला १३ आणि १४ डिसेंबर रोजी सुटी असेल. दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.


महाराष्ट्रात पुढील काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


अधिवेशनाआधी परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठक होईल. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचे अंतिम नियोजन केले जाईल. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.


Comments
Add Comment

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)

एचडीएफसी बँकेत चाललंय काय ? अर्धवेळ अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : क्रेडिट सुईस दिवाळखोरीत निघाली. नंतर यूबीएस या बँकिंग कंपनीने क्रेडिट सुईस विलीन करून घेतली. ही प्रक्रिया

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक

भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित नेत्यांवर कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी राज्यातील विविध नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.