कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे. अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जाहीर केले आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यानंतर १० आणि ११ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पुरवणी मागण्यांवर ११ डिसेंबर रोजी मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील. अधिवेशनाच्या कामकाजाला १३ आणि १४ डिसेंबर रोजी सुटी असेल. दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.


महाराष्ट्रात पुढील काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


अधिवेशनाआधी परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठक होईल. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचे अंतिम नियोजन केले जाईल. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.


Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही