कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने ही माहिती दिली आहे. अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक सचिवालयाने जाहीर केले आहे. हे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार, पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. यानंतर १० आणि ११ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पुरवणी मागण्यांवर ११ डिसेंबर रोजी मतदान घेऊन त्या मान्य केल्या जातील. अधिवेशनाच्या कामकाजाला १३ आणि १४ डिसेंबर रोजी सुटी असेल. दुसऱ्या आठवड्यात शासकीय कामांचे नियोजन आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी अशासकीय कामकाज पूर्ण केले जाईल.


महाराष्ट्रात पुढील काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा प्रभाव अधिवेशनाच्या कामकाजावर दिसेल. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. यामुळे अधिवेशनात या विषयावर चर्चेची शक्यता आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


अधिवेशनाआधी परंपरेनुसार सर्वपक्षीय बैठक होईल. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाचे अंतिम नियोजन केले जाईल. वेळापत्रकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले की त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.


Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७