विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत झाली होती. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बोट समुद्रातच अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ झाला होता.



नेमकी घटना काय?


रविवारी संध्याकाळच्या सुमारास सफाळ्याच्या जालसार जेट्टीवरून निघालेली रो-रो फेरीबोट विरारच्या नारिंगी जेट्टीजवळ पोहोचण्यापूर्वी समुद्रात अडकली. ही बोट प्रवाशांनी भरलेली होती.



हायड्रोलिक पंप तुटला आणि बोट अडकली


मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगी जेट्टीवर बोटीला किनाऱ्यावरील 'रॅम्प'शी (उतार असलेला जोडणीचा भाग) जोडणाऱ्या हायड्रोलिक यंत्रणेचा पाईप तुटला. यामुळे रॅम्प वर-खाली करणे शक्य झाले नाही आणि बोट समुद्रातच थांबून राहिली. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली.

त्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या (MMB) अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बोट जेट्टीवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली. या बोटीवरील सर्व प्रवासी तसेच गाड्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.

याबाबत मंत्री नितेश राणे यांनीही ट्वीट करत ही माहिती दिली. पाहा काय म्हणाले नितेश राणे

 



 
Comments
Add Comment

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका