नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावर्षी साईबाबांच्या पुण्यतिथीला एका भक्ताने चक्क १ कोटींचा हार साईचरणी अर्पण केला आहे. त्या भक्ताने स्वतःचे नाव जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याचे नाव अजूनही गुप्तच आहे. हा आंध्रप्रदेशातील साईभक्त आहे. त्याने ९४५ ग्रॅम वजन असेल हार साईबाबांना अर्पण केला.


दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येतात. दर्शनाला आलेले भाविक यथाशक्ती दानधर्म करतात. अनेक भाविक मौल्यवान वस्तू किंवा दागिने अथवा मोठी रक्कम साईचरणी अर्पण करतात. मुक्त हस्ताने दान करणारे भक्त हे शिर्डीला दरवर्षी बघायला मिळतात. या वर्षी आंध्रप्रदेश मधील भक्ताने १ कोटींचा हार साईबाबांना अर्पण केला आहे.


हा मौल्यवान हार फक्त वजनानेच नाही तर दिसायला सुद्धा भारदस्त आहे. या हारात हिरे, माणिक मोती आहेत. हाराची बाजारातील किंमत १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० इतकी आहे. हा हार नवरत्नांचा आहे, तो शिर्डीचे मुख्य कार्यकर्ते अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे