नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावर्षी साईबाबांच्या पुण्यतिथीला एका भक्ताने चक्क १ कोटींचा हार साईचरणी अर्पण केला आहे. त्या भक्ताने स्वतःचे नाव जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याचे नाव अजूनही गुप्तच आहे. हा आंध्रप्रदेशातील साईभक्त आहे. त्याने ९४५ ग्रॅम वजन असेल हार साईबाबांना अर्पण केला.


दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येतात. दर्शनाला आलेले भाविक यथाशक्ती दानधर्म करतात. अनेक भाविक मौल्यवान वस्तू किंवा दागिने अथवा मोठी रक्कम साईचरणी अर्पण करतात. मुक्त हस्ताने दान करणारे भक्त हे शिर्डीला दरवर्षी बघायला मिळतात. या वर्षी आंध्रप्रदेश मधील भक्ताने १ कोटींचा हार साईबाबांना अर्पण केला आहे.


हा मौल्यवान हार फक्त वजनानेच नाही तर दिसायला सुद्धा भारदस्त आहे. या हारात हिरे, माणिक मोती आहेत. हाराची बाजारातील किंमत १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० इतकी आहे. हा हार नवरत्नांचा आहे, तो शिर्डीचे मुख्य कार्यकर्ते अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.