ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामन्यात टॉस दरम्यान एक मोठा गोंधळ झाला आहे. या घटनेत मॅच रेफरीने चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप होत असून, त्यामुळे भारतीय संघाची स्पष्टपणे अडवणूक झाल्याचे बोलले जात आहे.


भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक केली आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने "टेल्स" असा कॉल केला. मात्र, नाणे "हेड्स" असे पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे नियमानुसार भारताने टॉस जिंकला असता. पण मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झ आणि टॉस होस्ट मेल जोन्स यांनी "हेड्स" कॉल असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानला विजयी घोषित केले.


यानंतर, फातिमा सनाला निर्णय विचारण्यात आला आणि तिने लगेच गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.





हरमनप्रीत कौरने त्याक्षणी काही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे तिला कॉल योग्य ऐकू आला नव्हता का? याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पण प्रेक्षक आणि सोशल मीडियावर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, कारण टॉसचा निर्णय हा मॅच रेफरी आणि प्रेझेंटरकडून स्पष्ट आणि अचूक दिला जाणे आवश्यक असते.


क्रिकेटसारख्या खेळात अशा चुका क्वचितच पाहायला मिळतात, पण जेव्हा भारत-पाकिस्तानसारखा उच्च तणाव असलेला सामना असतो, तेव्हा अशा गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. या प्रकारामुळे सामन्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील