खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ खबरदारीची पावले उचलली आहेत. या सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' (Diethylene Glycol) नावाचे विषारी रसायन आढळल्याचा संशय आहे.


राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपच्या एका विशिष्ट बॅचच्या (Batch No. SR-13) विक्रीवर, साठवणुकीवर आणि वितरणावर महाराष्ट्रात तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.



माहिती देण्यासाठी टोल-फ्री क्रमांक


या संदर्भात कोणतीही माहिती देण्यासाठी, तसेच नागरिकांकडे जर या प्रतिबंधित बॅचचे सिरप आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यासाठी राज्याच्या FDA विभागाने टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केला आहे.


टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365



नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्याकडे 'कोल्ड्रिफ' सिरपची Batch No. SR-13 ही आढळल्यास त्यांनी त्वरित वरील क्रमांकावर संपर्क साधावा.



पालकांना महत्त्वाचे आवाहन


आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही कफ सिरप देऊ नये. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांना खोकल्याचे सिरप देणे टाळावे. सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरांच्या लेखी सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावेत.


एफडीएने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांना तातडीने या विशिष्ट सिरपचा साठा गोठवण्याचे (freeze करण्याचे) आदेश दिले आहेत. पुढील तपासणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त