वसईत गॅस पाईपलाईन फुटली


वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली. रस्त्याला अचानक खड्डे पडू लागले. पक्का रस्ता उखडला. रस्त्याखाली असलेल्या गॅस पाईपलाईनमधून गळती सुरू झाली. गॅस पाईपलाईन सोबतच परिसरातील एक पाण्याची लाईन (जलवाहिनी) पण फुटली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचं घाणेरडे पाणी उसळून वर येऊ लागले. सर्वत्र चिखल झाला.


गॅस पाईपलाईन आणि पाण्याची लाईन एकाचवेळी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवार उडू लागले. रस्ता फाटत असल्याचे स्थानिकांनी बघितले. हे दृश्य बघून नागरिक घाबरले. थोड्याच वेळात त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. यानंतर अडथळे ठेवून रस्ता बंद करण्यात आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करुन माहिती दिली. रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने तिथून हटवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. महापालिका प्रशासनाने तातडीने संबंधित जलवाहिनीला होणारा पाणी पुरवठा थांबवण्यासाठी आवश्यक ते उपाय केले. तर अग्निशमन दलाने गॅस कंपनीच्या अभियंत्याच्या सहकार्याने वायू गळती थांबवण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय केले. यामुळे अनर्थ टळला.




Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

Anil Ambani ED Case | अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे