शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद


विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व सुरळीत पार पडले. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे २३ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते, तसेच ०४ जेट्टींच्या ठिकाणी व ०२ बंद दगड खाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या विसर्जनात १,६६७ घरगुती व ९५७ सार्वजनिक अशा एकूण २,६२४ मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी १,०७६ घरगुती व ४७७ सार्वजनिक असे एकूण १,५५३ मूर्तींचे विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये झाले. तसेच ५९१ घरगुती व ४८० सार्वजनिक असे एकूण १,०७१ मूर्तींचे विसर्जन हे जेट्टीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी झाले.


पालिकेने विसर्जन स्थळी निर्माल्य जमा करणे साठी ठेवलेले निर्माल्य कलश, घट ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था, विद्युत व्यवस्था व इतर सर्व आवश्यक सोई सुविधा तसेच जेटीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी विसर्जनासाठी केलेली बोटीची, तराफ्यांची व्यवस्था, विसर्जन स्थळी केलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, अग्निशमन कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानेही विसर्जनाच्या मार्गांवर ट्रॅफिकचे उत्तम नियोजन केल्यामुळे व मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतल्यामुळे विसर्जन योग्यरीत्या पार पडण्यास सहकार्य मिळाले.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना