कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी

माजी आमदार सुभाष भोईर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कल्याण-शिळ महामार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्याचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्राद्वारे केली आहे. त्यावेळी कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील असे सांगितले आहे.


कल्याण-शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण-शिळ महामार्गावरून नवी मुंबई औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये - जा करीत असतो. या महामार्गावर रुग्णवाहिका देखील तासनतास अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या महामार्गावर दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार व व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.


त्यामुळे कल्याण शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच महापे रस्ता आणि वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंतची वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

NITESH RANE : अवैध मासेमारीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

MUMBAI : "राज्यातील सागरी सीमांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ड्रोन आधारित देखरेख

MARINA PROJECT : मच्छीमारांना विश्वासात घेऊनच 'मरीना' प्रकल्प पूर्ण करणार- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

MUMBAI : "मुंबईतील कफ परेड येथे साकारण्यात येणारा प्रस्तावित 'मरीना' प्रकल्प हा मुंबईच्या सागरी पर्यटन, जलवाहतूक आणि

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले