‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका वाढला; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना


मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. पुढील काही दिवसांत ते तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


‘शक्ती’ चक्रीवादळाने मागील सहा तासांत सुमारे आठ किलोमीटर प्रतितास वेगाने वायव्य दिशेने हालचाल केली आहे. हे चक्रीवादळ ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशाजवळ केंद्रित होते.


त्या वेळी हे केंद्र


द्वारका (गुजरात) पासून सुमारे २८० किमी पश्चिमेला, नालिया पासून २९० किमी पश्चिम-नैऋत्येला, कराची (पाकिस्तान) पासून ३३० किमी दक्षिण-नैऋत्येला आणि पोरबंदरपासून ३२० किमी पश्चिमेला होते.


हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ ४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ५ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम-नैऋत्येकडे सरकून उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल.


मच्छीमारांना सूचना : समुद्रात जाणे टाळा


भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्या आहेत की, पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत की, या सूचनेची माहिती सर्व मच्छीमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

Mumbai-Goa Express Way : कोकणकरांचा प्रवास आता होणार सुसाट; महामार्ग लवकरच तयार होण्याच्या मार्गावर

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे आणि बहुतेक जणांच्या नजरा या कोकणाकडे वळल्या आहेत, त्यामुळे गावच्या वाटा

Neelam Gorhe Shivsena : नीलम गोऱ्हेना शिवसेनेतच विरोध? तरीही शिंदेनी दिली उमेदवारी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Watermelon Case : कलिंगड खाऊन मृत्यू की प्लॅन केलेला कट? पायधुनीतील 'त्या' ४ मृत्यूंमागे ७ वर्ष जुनं रहस्य!

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल

APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची