IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या 'डबल सिस्टीम'मुळे देशातील हवामानात मोठा बदल होणार असून, अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हे दोन्ही कमी दाबाचे पट्टे अनुक्रमे पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील समुद्रात निर्माण झाले आहेत. या दोन पट्ट्यांमुळे त्यांची तीव्रता वाढून देशातील हवामान मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी 'अतिमुसळधार पावसाचा' इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. संभाव्य पूरसदृश स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे शेतीचे आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, IMD च्या अंदाजानुसार नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.




 

कच्छ, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात 'तीन' कमी दाबाचे पट्टे


भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा गंभीर इशारा दिला आहे. भारताच्या समुद्र क्षेत्रांमध्ये एकाच वेळी 'तीन' कमी दाबाचे पट्टे (Low Pressure Areas) निर्माण झाले आहेत, ज्यामुळे १० ऑक्टोबरपर्यंत देशात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही कमी दाबाचे पट्टे पुढीलप्रमाणे सक्रिय झाले आहेत. कच्छची खाडी आणि उत्तर-पूर्व अरबी समुद्र, बंगालचा उपसागर यापैकी कच्छच्या खाडी आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, ज्यामुळे धोका वाढला आहे. या तिहेरी हवामान प्रणालीचा परिणाम म्हणून देशातील अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६० किमी इतका प्रचंड असणार आहे. यामुळे अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठी हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. अरबी समुद्र, कच्छची खाडी आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी निर्माण झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे १० ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन IMD कडून करण्यात आले आहे.



'या' १३ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा


स्कायमेटने (Skymet) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे देशभरात खालील प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारत: पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, दक्षिण/मध्य भारत: आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. पश्चिम/उत्तर भारत: गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश. या अंदाजामुळे महाराष्ट्राची चिंता अधिक वाढली आहे. राज्यात आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यातच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांवर आणि प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. आज देखील नाशिकसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य