Maharashtra Monsoon Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

- कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन


मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यामुळे तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Monsoon Update)


विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियामध्ये धान लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. धान लागवडीसाठी महिला मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाल्याने ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. (Maharashtra Monsoon Update)


याउलट अकोला जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्याप बाकी आहे. पावसाची २२ टक्के तूट असल्याने धरणांमधील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे. उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार अल्पकालीन पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (Maharashtra Monsoon Update)



अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत असल्याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालीतील चढ-उतार, एल निनो आणि ला निना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र" पंढरपूर :

Devendra Fadnavis : "पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना मोठा दिलासा, कोणावरही अन्याय होणार नाही"; आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

- अडीच वर्षांत पूर्ण होणार मंदिर परिसर विकास, वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार पंढरपूर : आषाढी

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीला पंढरपुरात भक्तीचा महासागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त संपूर्ण पंढरपूर (Pandharpur) विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. लाखो

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारी दरम्यान प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णाची केली विचारपूस

पंढरपूर : आषाढी वारी (Ashadhi Wari) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे आलेल्या एका भाविकाला अचानक छातीत त्रास (Chest Pain) जाणवू लागल्याने

Ashadhi Ekdashi 2026 : सलग २० वर्षे वारीचं फळ! धाराशिवच्या माने दाम्पत्याला विठुरायाच्या महापूजेचा मान

पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीची

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठुरायाचे रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक पोहोचले आहेत. हा आकडा