रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा


मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. यामुळे आयात निर्यात असंतुलन निर्माण झाले आहे. हे असंतुलन दूर करण्यासाठी रशियाने भारताकडून औषधे, कृषीमाल यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.


काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतीय औषधांवरील टॅरिफमध्ये वाढ केली. यामुळे भारतीय औषधे अमेरिकेत महाग झाली. भारताच्या अमेरिकेतील औषध विक्रीत घट होऊ लागली. पण रशियाने घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेत होत असलेला तोटा भरुन काढण्याची संधी भारतीय औषध कंपन्यांना मिळणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारतातून विविध वस्तू आणि सेवांची आयात वाढवण्यासाठी लवकरच आणखी निर्णय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सोची येथे वालदाई डिस्कशन क्लबमध्ये दिलेल्या विशेष मुलाखतीत पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदी कायम देशहिला सर्वोच्च प्राधान्य देतात. ते देशाचा फायदा तोटा याचा हिशेब मांडून नंतर निर्णय घेतात. कोणाच्या दबावाला बळी पडून निर्णय घेणे किंवा निर्णय बदलणे हा मोदींचा स्वभाव नाही; असे पुतिन यांनी मोदींविषयी बोलताना सांगितले.


भारत दर महिन्यात रशियातून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. हे तेल भारतीय रिफायनरीत नेले जाते यानंतर शुद्ध केलेले तेल भारत युरोपला विकतो. या व्यवहारातून रशिया, भारत आणि युरोपमधील देश या सर्वांनाच फायदा होत आहे. यामुळेच हा व्यापार सुरू आहे. अमेरिका विकत असलेले तेल महाग आहे. हे तेल खरेदी करणे जगातील अनेक देशांना कठीण आहे. पण भारताने दिलेल्या पर्यायामुळे जगातील अनेक देश त्यांची उर्जेची गरज पूर्ण करू शकतात. भारत तेलाच्या व्यापारातून फायदा घेत असला तरी कोणत्याही देशाची फसवणूक करत नाही किंवा कोणालाही लुबाडत नाही, असे पुतिन म्हणाले. अमेरिकेचे शस्त्र विक्री आणि तेल विक्रीचे धोरण फसवे आणि दुटप्पी आहे. या धोरणाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असेही पुतिन म्हणाले.


भारत आणि रशिया यांच्यात सोवियत रशिया असल्यापासून मैत्री आहे. या मैत्रीला मोठा इतिहास आहे. किरकोळ फायद्यातोट्याच्या गणितावर ही मैत्री अवलंबून नाही; असे पुतिन म्हणाले. त्यांनी भारत एक विश्वासू मित्र असल्याचे सांगितले.


Comments
Add Comment

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि

अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम

न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे

वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक