Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने दाखवलेले शौर्य आणि पराक्रम पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला. या खंडा स्पर्धेदरम्यान, एका स्पर्धकाने केवळ चार मिनिटांमध्ये तब्बल ४२ किलो वजनाची खंडा तलवार डोक्यावरून ९० वेळा फिरवून एक विक्रमच प्रस्थापित केला. ही ४२ किलोची जड तलवार एका वेळी फिरवतानाही अनेकांची दमछाक होते. मात्र, या स्पर्धकाने दाखवलेला दमदार स्टॅमिना आणि कौशल्य वाखाणण्याजोगे होते. या अविश्वसनीय पराक्रमामुळे या स्पर्धकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि खंडोबाच्या गडावर जय भवानी-जय मल्हारच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.






खंडा स्पर्धेमध्ये केवळ तलवार फिरवणे एवढेच नव्हे, तर अनेक मर्दानी कसरती सादर करण्यात आल्या. या स्पर्धेत प्राचीन युद्धकला आणि शारीरिक बळ यांचे प्रदर्शन करण्यात येते. यामध्ये तलवार एका हाताने तोलून धरणे, तलवारीला घेऊन वेगवेगळ्या शारीरिक कसरती करणे, जोर काढणे (पुशअप्स) आणि युद्धामध्ये ज्या पद्धतीने तलवार फिरवली जाते, त्या युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवणे असे अनेक रोमांचक प्रकार सादर झाले. जेजुरीच्या या खंडा स्पर्धेमुळे मर्दानी दसरा उत्सवाला एक ऐतिहासिक आणि साहसी किनार मिळाली असून, प्राचीन युद्धकला जतन करण्याची परंपरा आजही कायम असल्याचे यातून सिद्ध होते.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या